Thursday, October 3, 2013

एक विचार माझा....

अनन्यसाधारण वेग प्रकाशाचा असून एखाद्या ग्रहापासूनचे;तार्यापासूनचे अंतर दर्शविण्यासाठी अजूनही प्रकाशाचे परिमाण वापरले जाते.याचं कारण लाखो किलोमिटर प्रवास करुन प्रकाश हा "प्रकाशच"राहतो.त्याचं वस्तुमानात परिवर्तन होत नाही.आईन्टाईनने हे सिद्घ केलेले आहे.
मला वाटतं आज मनुष्य गतिमान झाला.सूक्ष्म द्रव्यापरि असलेलं त्याचं मनही गतिमान झालं.एखादी गोष्ट वस्तुमानात परिवर्तीत झाली की त्याला वस्तुमानाचे गुण लागू होतात.मनुष्याचं चैतन्यापाशी असणं.. सूक्ष्म;तरल मनाच्या पातळीवर असणं कमी होतं चाललं.जड देहाशी मनाची नाळ जुळली.त्यामुळे कदाचित गतिमान मन हे वस्तुमानाप्रमाणे "जड" होत गेलं.वस्तुमानाचे गुण त्यात दिसूं लागले.परिणामी मनुष्य भावनाहिन झाला...संवेदना लोप पावली..पाषाणापरि बनून गेला.कारण ईतुकेच की तो गतिमान झाला....
गतिमान होऊनही जो चैतन्यापाशी उरला तो कलाकार;कलासक्त;शास्त्रद्न्य झाला..व जो चैतन्यची केवळ राहिला तो संतत्वात विलिन जाहला......!

1 comment:

  1. parag tumhi tari mala ya saryachya palyad pochlele janvat rahata nehemich. tumche mn halkyashya morpisa sarkhe...mhanunach kevhach digantari jaun krushnacharani kshanat leen hote...

    ReplyDelete