Sunday, March 13, 2016

तो...प्राणसखा..

त्या केशवाचा अगदी पळभरासाठी निरोप घेतला मी..त्या कालिंदी तटीच्या कदंबवृक्षातळीं.त्याचे ते मृदू निलवर्णी हात मजहाती होते ..संध्या आरक्त होती ..अन् तो आदित्य रेंगाळलेला..पळभराचा विरह कुणासाठी सुखावह नव्हता .."तुला कार्य करायचं आहे ;कर्तव्य धर्म पाळायचा आहे. हे करताना मी सतत तुझ्यासवें असेनच..मग तू माझ्या ठायी विलिन होशील.." इतकंच तो बोलला.परंतु ते शब्द विरहाचे दूत ठरले जणू ..त्यानं आश्वासक असं स्मित केलं..मन म्हणालं 'कृष्णा नको न रे असा जीवघेणा खेळ करु..निरोप देता देता बांधणारं तुझं हसू ..!' पण ही खेळी तोच करु जाणे ..मी दूर जाऊ नये म्हणून त्या स्मित हास्याचे बंध बांधण्याची खेळी..
शीत मधुर वा-याच्या लहरीं त्याच्या मोरपिंसाच्या एकेक "तारेस "छेडून जात होत्या. अन् त्या तटावरील निशब्द शांततेत मालकंसाचे सूर उमटत होते..!

No comments:

Post a Comment